हिंगोली जिल्हा (महाराष्ट्र)
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
| मुख्यालय | हिंगोली |
| लोकसंख्या | ११,७८,९७३ (२०११) |
| लोकसंख्या घनता | २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल) |
| साक्षरता दर | ७६.०४% |
| प्रमुख शहरे | हिंगोली व सर्व तालुके |
| जिल्हाधिकारी | श्री. सुनील भंडारी |
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.२ आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.